Kala Ram Mandir (नाशिक)
India /
Maharashtra /
Nashik /
नाशिक
World
/ India
/ Maharashtra
/ Nashik
जग / भारत / महाराष्ट्र / नाशिक
राम मंदिर
गट निवडा
हेमाडपंती स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे नाशिकमधील काळाराम मंदिर. प्रभुरामचंद्र त्यांच्या वनवास कालखंडात १४ वर्षांतील सव्वादोन वर्षं ज्या ठिकाणी वास्तव्यास होते , त्याच पर्णकुटीच्या जागी हे मंदिर सुवर्णशिखरासह मोठ्या डौलाने उभे आहे.
......
श्रीक्षेत्र नाशिकला प्रत्येक युगात निरनिराळी नावे पडली. कृतसत्य युगात भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टी रचण्याकरीता पद्मासन घालून तप केले. त्यामुळे पद्मनगर नाव पडले. त्रैतायुगात , काट्याप्रमाणे विध्वंसक असणाऱ्या खर-दुषण आणि त्रिशिर या राक्षसांचा संचार असल्यामुळे ' त्रिकंटक ' नाव पडले. द्वापार युगांत जनक राजाने अनेक यज्ञ यागादि कर्मे करून वास्तव्य केले म्हणून जनस्थान , प्रभु रामचंद्र व लक्ष्मणाने रावण भगिनी शूर्पणखा हिचे नासिका छेदन केले म्हणून कलीयुगात नाशिक म्हटले जाऊ लागले. या भूमीत मोठ्या प्रमाणावर गुलाब पिकत असल्यामुळे (आजही होतात) औरंगजेबाच्या काळात नाव पडलं होतं ' गुलशनाबाद '. औरंगजेबाच्या काळातच नाशिकमधल्या अनेक मंदिरांचा विध्वंस झाला. पुढे पेशवाई आल्यानंतर पेशव्यांच्या लहान-मोठ्या सरदारांनी १७०७ ते १७९२ या काळात कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान असलेल्या नाशिकचा कायाकल्प हाती घेतला. अहिल्याबाई होळकरांनी गोदावरीचा घाट , सरदार नारोशंकर राजेबहाद्दरांचे नारोशंकर शिवमंदिर , नीळकंठेश्वर , कपालेश्वर , सुंदरनारायण अशी अनेक मंदिरे नाशिकमध्ये उभी राहिली. या सर्व मंदिरांचा मुकुटमणी हेमाडपंती स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे काळाराम मंदिर. पेशव्यांचे सरदार असलेल्या रंगराव ओढेकर यांनी १७७२ ते १७९२ काळात हे मंदिर बांधून रामचरणी अर्पण केले. प्रभुरामचंद्र त्यांच्या वनवास कालखंडात १४ वर्षांतील सव्वादोन वर्षं ज्या ठिकाणी वास्तव्यास होते , त्याच पर्णकुटीच्या जागी हे मंदिर सुवर्णशिखरासह मोठ्या डौलाने उभे आहे.
मंदिराची रचना अद्भुत असून पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण अशा चारही दिशांनी मंदिरात प्रवेश करता येतो. पूर्व दाराने आत आल्यानंतर मोठे भव्य प्रांगण व आतील भागात ओवऱ्यांना (हा शब्दही अलीकडे ऐकायला मिळत नाही) ८४ महिरपी असून ८४ लक्ष योनींचे प्रतीक म्हणून त्यांची रचना केलेली आहे. सभामंडपाच्या एका टोकाला असलेल्या हनुमान मंदिराला ४० स्तंभाचा आधार आहे. हनुमान चालिसा म्हणून ४० स्तंभ आहेत , असे म्हणतात. परंतु , वेदामध्ये ४० अक्षरांचा विराटछन्द , १० अक्षराच्या चार ओळी (१० x ४=४०) असेही एक गणित आहे. मुख्य मंदिरात येण्यासाठी १४ पायऱ्या चढाव्या लागतात. १४ पायऱ्या प्रभुरामचंद्राच्या १४ वर्षांच्या वनवासाचे प्रतीक म्हणून. शिवाय विद्येचे स्थानही चौदावे सांगितले आहे. तीन शिखरे असलेल्या द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर , उपगर्भगृह अर्थात जिथून भाविक दर्शन घेतात ती मेघडंबरी आठ स्तंभांवर उभी आहे. या मेघडंबरीची आतून एक हजार पाकळ्या असलेल्या उलट्या कमळाची रचना कोरलेली आहे. ही सहस्त्राधार रचना म्हणजे अधोमुख श्रीयंत्र. प्रभुराम अयोध्येत ' श्री ' सोडून आले होते , हे त्यातून मंदिरांच्या रचनाकारांना सांगायचे आहे.
मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात राम , लक्ष्मण , सीता माता यांच्या मूर्ती विद्यमान आहेत. त्यातील प्रभुरामचंद्र उजवा हात छातीवर आणि डावा हात पायाकडे करून अभयमुद्रेमध्ये उभे आहेत. मंदिरात त्रिकाळ अर्चन होते , प्रातः साडेपाच वाजता काकड आरती , दुपारी बारा वाजता माध्यन्य पूजा आणि सायंकाळी आठ वाजता शेजआरती. गेल्या २७ पिढ्यांपासून त्रिवर्ग पुजारी घराण्याने अव्याहतपणे प्रभुरामाची ही सेवा अखंडित ठेवली आहे. मंदिरात गुढीपाडवा ते चैत्र फाल्गुन महोत्सव , चार नवरात्री , २४ एकादशी , महापर्व धुमधडाक्यात साजरी केली जातात. गुढीपाडवा रामनवमी-रथयात्रा (चैत्र कामदा एकादशी) आणि वासंतिक नवरात्रोत्सवास महाराष्ट्रात एक प्रमुख सांस्कृतिक महोत्सव म्हणून मान्यता आहे. दसऱ्याच्या दिवशी या मंदिरातील प्रभुराम चांदीच्या पालखीतून सीमोल्लंघनाला जातात. गाव वेशीवर शस्त्रपूजन होऊन पुन्हा वाजतगाजत रात्री नऊपर्यंत परत येतात.
मंदिराचे बांधकाम १७७२ ते १७९२ या कालखंडात २४ लाख रुपये खर्चून झाल्याची नोंद पेशवे दप्तरी आहे. सरकार ओढेकरांची सर्व संपत्ती मंदिर बांधण्याच्या कामी खर्च झाली. परंतु मंदिराच्या सुवर्ण कलशांचे काम अपूर्ण होते. त्यामुळे सरदार ओढेकरांनी त्यांच्या पत्नीचे अलंकार मोडून सुवर्ण शिखराचे काम पूर्ण केल्याची आख्यायिका आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेली नाशिक नगरी शातकर्णेच्या काळात एक महान नगरी म्हणून ओळखली जाई. या नगरीत सरदार , मांडलिक , मानकरी यांच्या घरापेक्षा राजमंदिर उंचीवर होते व राजमंदिरापेक्षा देवमंदिर उच्च होते. याचा अर्थ असा की , राजा कितीही मोठा असला तरी तो देवापुढे छोटा होय. या श्रद्धेतून नाशिकमधील काळाराम मंदिरालाही अनन्य स्थान प्राप्त झाले. नाशिकजवळच्या टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य होते. ते गोदावरीत स्नान करत आणि काळारामाच्या दर्शनाला येत. त्याकाळी हे मंदिर लाकडी होते. मात्र , मूर्ती आज आहेत त्याच होत्या. अनेक श्लोक , करूणाष्टके , आरत्या यांच्या रचना समर्थांनी याच काळारामाच्या पुढ्यात केल्या आहेत.
नृत्य , नाट्य. संगीत , शिल्प , चित्र , काव्य अशा कितीतरी कलाप्रांतातील दिग्गजांनी काळारामाच्या चरणी त्यांची सेवा अर्जित केली असून हे मंदिर त्यांच्या प्रतिभेला आणि सृजनाला फुलविणारे ठरलेले आहे. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी तर त्यांचे उत्तरायुष्य काळारामाच्याच चरणी समर्पित केले होते. बालगंधर्व , राम मराठे , पं. भीमसेन जोशी , पं. जसराज , गंगुबाई हनगल , पं. शौनक अभिषेकी , संजीव अभ्यंकर असे कलाकार असोत की लोकमान्य टिळक , आगरकर , वि. दा. सावरकर , बाळासाहेब ठाकरे असे नेते असोत ; काळाराम मंदिरात असे अनेक दिग्गज हजेरी लावून गेले आहेत. कुसुमाग्रज मंदिरात येत नसत. पण , पहाटे मंदिरात येऊन पूर्व दरवाजाशी असलेल्या ओवऱ्यांमध्ये शांतपणे बसत.
केवळ भक्ती आणि श्रद्धा यांच्यापुरताच काळाराम मंदिराचा विषय मर्यादित नाही. नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक अभिसरणातही या मंदिराचा मोलाचा सहभाग आहे. सत्याग्रह आणि समतेच्या लढ्याशी हे मंदिर जोडले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी २ मार्च १९३० रोजी हजारो स्त्री-पुरुषांच्या साथीने श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशाचे रणशिंग फुंकले. युगायुगानंतर स्वयंसिद्ध करुणामय समाजित रक्तविहीन क्रांतीसाठी सातत्याने पाच वर्षं हा लढा सुरू होता व मानव मुक्तीचा एक अध्याय या काळाराम मंदिराच्या साक्षीने घडत होता.
......
श्रीक्षेत्र नाशिकला प्रत्येक युगात निरनिराळी नावे पडली. कृतसत्य युगात भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टी रचण्याकरीता पद्मासन घालून तप केले. त्यामुळे पद्मनगर नाव पडले. त्रैतायुगात , काट्याप्रमाणे विध्वंसक असणाऱ्या खर-दुषण आणि त्रिशिर या राक्षसांचा संचार असल्यामुळे ' त्रिकंटक ' नाव पडले. द्वापार युगांत जनक राजाने अनेक यज्ञ यागादि कर्मे करून वास्तव्य केले म्हणून जनस्थान , प्रभु रामचंद्र व लक्ष्मणाने रावण भगिनी शूर्पणखा हिचे नासिका छेदन केले म्हणून कलीयुगात नाशिक म्हटले जाऊ लागले. या भूमीत मोठ्या प्रमाणावर गुलाब पिकत असल्यामुळे (आजही होतात) औरंगजेबाच्या काळात नाव पडलं होतं ' गुलशनाबाद '. औरंगजेबाच्या काळातच नाशिकमधल्या अनेक मंदिरांचा विध्वंस झाला. पुढे पेशवाई आल्यानंतर पेशव्यांच्या लहान-मोठ्या सरदारांनी १७०७ ते १७९२ या काळात कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान असलेल्या नाशिकचा कायाकल्प हाती घेतला. अहिल्याबाई होळकरांनी गोदावरीचा घाट , सरदार नारोशंकर राजेबहाद्दरांचे नारोशंकर शिवमंदिर , नीळकंठेश्वर , कपालेश्वर , सुंदरनारायण अशी अनेक मंदिरे नाशिकमध्ये उभी राहिली. या सर्व मंदिरांचा मुकुटमणी हेमाडपंती स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे काळाराम मंदिर. पेशव्यांचे सरदार असलेल्या रंगराव ओढेकर यांनी १७७२ ते १७९२ काळात हे मंदिर बांधून रामचरणी अर्पण केले. प्रभुरामचंद्र त्यांच्या वनवास कालखंडात १४ वर्षांतील सव्वादोन वर्षं ज्या ठिकाणी वास्तव्यास होते , त्याच पर्णकुटीच्या जागी हे मंदिर सुवर्णशिखरासह मोठ्या डौलाने उभे आहे.
मंदिराची रचना अद्भुत असून पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण अशा चारही दिशांनी मंदिरात प्रवेश करता येतो. पूर्व दाराने आत आल्यानंतर मोठे भव्य प्रांगण व आतील भागात ओवऱ्यांना (हा शब्दही अलीकडे ऐकायला मिळत नाही) ८४ महिरपी असून ८४ लक्ष योनींचे प्रतीक म्हणून त्यांची रचना केलेली आहे. सभामंडपाच्या एका टोकाला असलेल्या हनुमान मंदिराला ४० स्तंभाचा आधार आहे. हनुमान चालिसा म्हणून ४० स्तंभ आहेत , असे म्हणतात. परंतु , वेदामध्ये ४० अक्षरांचा विराटछन्द , १० अक्षराच्या चार ओळी (१० x ४=४०) असेही एक गणित आहे. मुख्य मंदिरात येण्यासाठी १४ पायऱ्या चढाव्या लागतात. १४ पायऱ्या प्रभुरामचंद्राच्या १४ वर्षांच्या वनवासाचे प्रतीक म्हणून. शिवाय विद्येचे स्थानही चौदावे सांगितले आहे. तीन शिखरे असलेल्या द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर , उपगर्भगृह अर्थात जिथून भाविक दर्शन घेतात ती मेघडंबरी आठ स्तंभांवर उभी आहे. या मेघडंबरीची आतून एक हजार पाकळ्या असलेल्या उलट्या कमळाची रचना कोरलेली आहे. ही सहस्त्राधार रचना म्हणजे अधोमुख श्रीयंत्र. प्रभुराम अयोध्येत ' श्री ' सोडून आले होते , हे त्यातून मंदिरांच्या रचनाकारांना सांगायचे आहे.
मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात राम , लक्ष्मण , सीता माता यांच्या मूर्ती विद्यमान आहेत. त्यातील प्रभुरामचंद्र उजवा हात छातीवर आणि डावा हात पायाकडे करून अभयमुद्रेमध्ये उभे आहेत. मंदिरात त्रिकाळ अर्चन होते , प्रातः साडेपाच वाजता काकड आरती , दुपारी बारा वाजता माध्यन्य पूजा आणि सायंकाळी आठ वाजता शेजआरती. गेल्या २७ पिढ्यांपासून त्रिवर्ग पुजारी घराण्याने अव्याहतपणे प्रभुरामाची ही सेवा अखंडित ठेवली आहे. मंदिरात गुढीपाडवा ते चैत्र फाल्गुन महोत्सव , चार नवरात्री , २४ एकादशी , महापर्व धुमधडाक्यात साजरी केली जातात. गुढीपाडवा रामनवमी-रथयात्रा (चैत्र कामदा एकादशी) आणि वासंतिक नवरात्रोत्सवास महाराष्ट्रात एक प्रमुख सांस्कृतिक महोत्सव म्हणून मान्यता आहे. दसऱ्याच्या दिवशी या मंदिरातील प्रभुराम चांदीच्या पालखीतून सीमोल्लंघनाला जातात. गाव वेशीवर शस्त्रपूजन होऊन पुन्हा वाजतगाजत रात्री नऊपर्यंत परत येतात.
मंदिराचे बांधकाम १७७२ ते १७९२ या कालखंडात २४ लाख रुपये खर्चून झाल्याची नोंद पेशवे दप्तरी आहे. सरकार ओढेकरांची सर्व संपत्ती मंदिर बांधण्याच्या कामी खर्च झाली. परंतु मंदिराच्या सुवर्ण कलशांचे काम अपूर्ण होते. त्यामुळे सरदार ओढेकरांनी त्यांच्या पत्नीचे अलंकार मोडून सुवर्ण शिखराचे काम पूर्ण केल्याची आख्यायिका आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेली नाशिक नगरी शातकर्णेच्या काळात एक महान नगरी म्हणून ओळखली जाई. या नगरीत सरदार , मांडलिक , मानकरी यांच्या घरापेक्षा राजमंदिर उंचीवर होते व राजमंदिरापेक्षा देवमंदिर उच्च होते. याचा अर्थ असा की , राजा कितीही मोठा असला तरी तो देवापुढे छोटा होय. या श्रद्धेतून नाशिकमधील काळाराम मंदिरालाही अनन्य स्थान प्राप्त झाले. नाशिकजवळच्या टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य होते. ते गोदावरीत स्नान करत आणि काळारामाच्या दर्शनाला येत. त्याकाळी हे मंदिर लाकडी होते. मात्र , मूर्ती आज आहेत त्याच होत्या. अनेक श्लोक , करूणाष्टके , आरत्या यांच्या रचना समर्थांनी याच काळारामाच्या पुढ्यात केल्या आहेत.
नृत्य , नाट्य. संगीत , शिल्प , चित्र , काव्य अशा कितीतरी कलाप्रांतातील दिग्गजांनी काळारामाच्या चरणी त्यांची सेवा अर्जित केली असून हे मंदिर त्यांच्या प्रतिभेला आणि सृजनाला फुलविणारे ठरलेले आहे. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी तर त्यांचे उत्तरायुष्य काळारामाच्याच चरणी समर्पित केले होते. बालगंधर्व , राम मराठे , पं. भीमसेन जोशी , पं. जसराज , गंगुबाई हनगल , पं. शौनक अभिषेकी , संजीव अभ्यंकर असे कलाकार असोत की लोकमान्य टिळक , आगरकर , वि. दा. सावरकर , बाळासाहेब ठाकरे असे नेते असोत ; काळाराम मंदिरात असे अनेक दिग्गज हजेरी लावून गेले आहेत. कुसुमाग्रज मंदिरात येत नसत. पण , पहाटे मंदिरात येऊन पूर्व दरवाजाशी असलेल्या ओवऱ्यांमध्ये शांतपणे बसत.
केवळ भक्ती आणि श्रद्धा यांच्यापुरताच काळाराम मंदिराचा विषय मर्यादित नाही. नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक अभिसरणातही या मंदिराचा मोलाचा सहभाग आहे. सत्याग्रह आणि समतेच्या लढ्याशी हे मंदिर जोडले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी २ मार्च १९३० रोजी हजारो स्त्री-पुरुषांच्या साथीने श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशाचे रणशिंग फुंकले. युगायुगानंतर स्वयंसिद्ध करुणामय समाजित रक्तविहीन क्रांतीसाठी सातत्याने पाच वर्षं हा लढा सुरू होता व मानव मुक्तीचा एक अध्याय या काळाराम मंदिराच्या साक्षीने घडत होता.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 20°0'24"N 73°47'43"E
- राम मंदिर 128 किमी.
- Ram Mandir 143 किमी.
- Ram Janki Mandir 146 किमी.
- श्री राम मंदिर (भुलेश्वर) 155 किमी.
- श्रीराम मंदिर 174 किमी.
- Shree Ram Temple 226 किमी.
- Ram Janki Mandir 359 किमी.
- Ramlingeswar Mandir Daddi Mohange 444 किमी.
- shree ram mandir 474 किमी.
- Ram Mandir 497 किमी.
- Ambika Misal 0.3 किमी.
- कपालेश्वर मंदिर 0.3 किमी.
- रामसेतु 0.3 किमी.
- Kelkar Sadan 0.4 किमी.
- बालाजी मंदिर 0.4 किमी.
- श्री सुंदरनारायण मंदिर 0.4 किमी.
- श्री गंगा गोदावरी मंदिर 0.4 किमी.
- Gosavi Wada , Nashik 0.5 किमी.
- Ketkar wada 0.5 किमी.
- सुंदर नारायण मंदिर 0.6 किमी.
प्रतिक्रिया